सहजसोपे हृदयाला साद घालतात .
मनाचे सगळे मनोरे प्रतिबिंब म्हणून समोर ठाकतात .
भावनांच्या गुंतागुंतीत कधी आधार घेतला जातो ,
तो अलंकारिक अवजड शब्दांचा .
समोरचा गोंधळतो अर्थाच्या मोजमापात ,
मग भावना समजण कि न समजण ,
कौशल्य शब्द वापरणारा आणि झेलणारा त्यांचंच
कधी बेरजेतले हच्चे सुटले कि
गैरसमजाची राशी मात्र वाढत जाते .
ह्या सगळ्यात सगळी जागा अर्थानेच तर व्यापून राहते.
- शर्वरी
No comments:
Post a Comment